मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवरून भाजपने विधान भवनाच्या पायऱ्यांवर धरणे देऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे.
यासंदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’वीज देयकांबाबत शेतकऱ्यांची सुरू असलेली दिशाभूल, शेतकऱ्यांची वीज तोडण्याच्या अन्याय्य कारवाईचा निषेध आणि ओबीसी आरक्षण मिळवून देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारची चालढकल याचा माझ्या सहकारी भाजप आमदारांसह विधान भवनाच्या पायऱ्यांवर धरणे देऊन निषेध केला.’
वीज देयकांबाबत शेतकऱ्यांची सुरू असलेली दिशाभूल, शेतकऱ्यांची वीज तोडण्याच्या अन्याय्य कारवाईचा निषेध आणि ओबीसी आरक्षण मिळवून देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारची चालढकल याचा माझ्या सहकारी भाजपा आमदारांसह विधान भवनाच्या पायऱ्यांवर धरणे देऊन निषेध केला. pic.twitter.com/UMl0tvLtk1
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 24, 2021
दरम्यान, पुढे अजून एक ट्विट करत ते म्हणाले की,’मविआ सरकारचा अधिवेशनातील रस हा ३२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य करुन घेणे,१९ विधेयके संमत करून घेणे आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणूक नियम डावलून आवाजी मतदान पद्धतीने घेणे यापुरताच आहे’, असे पाटील म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध, रात्री जमावबंदी; आज होणार नवीन नियमावली जाहीर
- “तेव्हा बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस सभागृहात मोदींची नक्कल होताच….”; रुपाली पाटलांची टीका
- “मी म्याव म्याव केलं कारण…”; नितेश राणेंचं स्पष्टीकरण
- सत्तेचा माज चढणे म्हणजे काय हे शिवसेनेकडून शिकावं- अतुल भातखळकर
- “…यावरून राज्यकारभाराचा काय बट्ट्याबोळ झाला आहे याची कल्पना यावी”


