Share

‘अहंकार जोपासण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट व जनतेचे हाल हेच वसुली सरकार’

Published On: 

मुंबई : मेट्रो प्रकल्पावरुन सुरू झालेले राजकारण अजूनही सुरूच आहे. या प्रकल्पासाठी कार शेड उभारण्याच्या जागेवरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद सुरू आहे. शिवसेनेच्या अहंकारामुळे या प्रकल्पाची किंमत वाढली असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आलाय. त्यामुळे जनतेचे हाल होत असल्याचा आरोपही भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केलाय.

या संदर्भात अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. भातखळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे भुयारी मेट्रो रेल्वे ३ चा प्रकल्प खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. कार शेड विवादामुळे आजपर्यंत या प्रकल्पाची किंमत १० हजार कोटींनी वाढली आहे. आपला अहंकार जोपासण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट व जनतेचे हाल हेच वसुली सरकारने चालवले आहे.’

फडणवीस सरकारच्या काळात सुरू झालेले मेट्रो कार शेडचे काम अजूनही रखडलेले आहे. त्या वेळी शिवसेना आणि भाजप सत्तेत होते. त्याच वेळी शिवसेनेने या कारशेडच्या जागेला विरोध केला होता. त्या नंतर विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागली आणि निवडणुकीनंतर सत्तांतर झाले. आता शिवसेनेने कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, या सर्वात प्रकल्पाची किंमत वाढली असून यामुळे जनतेचे हाल होत असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!