Share

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तीन वारकऱ्यांचा मृत्यू

Published On: 

 टीम महाराष्ट्र देशा : तरडगाव ते फलटण माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना तीन भाविकांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलुबा तुळशीराम सोलने (वय ६५ रा. सिंदखेड राजा जि. बुलडाणा) व सुभाष चंद्रभान गायकवाड (वय ५५ रा. मुकुंदवाडी ता. जि. औरंगाबाद) व अन्य एक अशा तीन भाविकांचा पायी चालत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने शोककळा पसरली असून माऊलींच्या पायी वारीत आलेल्या या मृत्यूमुळे अनेक भाविकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. फलटणचे प्रांत संतोष जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील, तहसीलदार विजय पाटील, व मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी या दिंडीतील लोकांची भेट घेऊन या घटनेबाबत दुःख व्यक्त केले.

रायगडावरील सेलिब्रेटींचं फोटोसेशन निंदनीय – संभाजीराजे

इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!