Share

घोसला गावात तीन रोहित्र जळाली

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : वीज पुरवठ्याच्या रोहित्रांना अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी ता.२५ घोसला ता.सोयगाव येथे घडली. या आगीमुळे गावात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कनिष्ठ अभियंता अभिजित गौर यांचेसह पथकांनी धाव घेऊन घटना नियंत्रणात आणली व गावाच्या वीज पुरवठा पाच तासांच्या अथक प्रयत्नाने सुरळीत केला. त्यामुळे काही काल ग्रामस्थ घाबरले होते. या आगीत कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे महावितरणच्या वीज मंडळाने स्पष्ट केले आहे .

जरंडी वीज उपकेंद्रातून घोसला फिडर द्वारे गावाला वीज पुरवठा करण्यात येतो, गुरुवारी अचानक दाब वाढल्याने आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. वीज पुरवठ्याच्या तीन रोहित्रात आग लागली. सरपंच सुवर्णा वाघ यांनी तातडीने घटनेची माहिती महावितरणला दिली. कनिष्ठ अभियंता अभिजित गौर,वीज कर्मचाऱ्यांचे तीन पथक दाखल झाली.

रोहित्रांची आग नियंत्रणात आणण्यासाठी ज्ञानेश्वर वाघ,चंदू पाटील,ज्ञानेश्वर युवरे आदींनी मदत केली. त्यामुळे अनर्थ टळला घटनेनंतर महावितरणच्या पथकांनी तब्बल पाच तास अथक परिश्रम घेऊन गावाचा वीज पुरवठा सुरळीत केला.

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!