कोलकाता : पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये रविवारी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली पाोलिसांनी भाजपच्या तीन आमदारांना ताब्यात घेतले. परंतु नंतर तिघांचीही सुटका करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आमदार शंकर घोष, आनंदमय बर्मन व शिखा चट्टोपाध्याय हे सफदर हाश्मी चौक येथे निदर्शने करत होते. राज्य सरकारच्या विरोधात त्यांनी हे आंदोलन केले.
उत्तर बंगालमध्ये कोरोनाच्या चाचण्यांत घट झाली आहे. त्यामुळे मृत्युसंख्येत वाढ होत चालली आहे. परंतु राज्यात रविवारपासून १५ दिवसांसाठी लॉकडाऊन सुरू झाला आहे. त्यामुळे या तीन आमदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. वास्तविक निदर्शने सुरू असलेल्या ठिकाणी जास्त लोक सहभागी झालेले नव्हते. तिन्ही आमदारांनी नियमांचे पालन केले होते. त्यामुळे त्यांची नंतर सुटका करण्यात आली.
या प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे नेते गौतम देब म्हणाले, भाजपचे नेते लॉकडाऊनच्या काळात निदर्शने करून जनतेची फसवणूक करत आहेत. भाजपचा हाच खरा चेहरा आहे.विधानसभा निवडणुकीपासून राज्यात भाजप व तृणमूल असा तीव्र वाद, संघर्ष पाहायला मिळत आहे. निवडणूक निकालानंतरही राज्यात हिंसाचार सुरू असल्याचा दावा केला जातो. त्यातच कोरोनाच्या उच्चाटनासाठी आवश्यक प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तृणमूलने हे आरोप फेटाळून लावले आहेत
महत्वाच्या बातम्या
- सकारात्मक! २५ दिवसांनंतर कोरोनाचे नवे रुग्ण तीन लाखांपेक्षाही कमी
- कोरोना संसर्ग, मृत्यू टाळण्यासाठी प्लाझ्मा थेरपी लाभदायक नाही; आयसीएमआरचे मत
- धोनीच्या अंदाजात हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना तोडंघशी पडला फलंदाज
- करण जोहरच्या मुलांनी केली पावसाळ्याची तयारी; सोशल मिडियावर पोस्ट केला फोटो
- उस्मानाबादेत ऑक्सिजन पुरवठा होतोय सुरळीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
