नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. देशाच्या विविध भागातून शेतकऱ्यांनी त्याविरोधात आंदोलने केली आहेत. आताही पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी या कायद्यांविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. देशभरातून विरोध होत असला तरी केंद्र सरकार नवे कृषी कायदे मागे घेणार नाही असं सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारच्या मते हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळण्यास तसेच कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या कायद्यांत बदल करण्याचा प्रश्नच नाही अशी केंद्र सरकारची भूमिका आहे.
मात्र आता कृषी कायद्यांच्या विरोधासह इतर मागण्यांसाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ महामोर्चा काढला आहे. दिल्लीकडे निघालेल्या या मोर्चाला हरियाणामध्ये अंबाला-पटियाला बॉर्डरवर अडवण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संघर्ष होत आहे. सीमेवरच अडवल्यामुळे संतप्त मोर्चकऱ्यांनी पोलिसांच्या दिशेने कूच करत बॅरिकेटिंग फेकून दिल्या. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्याने अंबाला-पटियाला सीमेवर प्रचंड तणावाचं वातावरण आहे. तर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्या पलवल बॉर्डरवरही 1500 पोलीस तैनात करण्यात आले आहे. पोलिसांसह महिला पोलीसही यावेळी तैनात आहेत. पलवल येथून बल्लभगड, फरिदाबादहून दिल्लीकडे जाणाऱ्या प्रत्येक कारची तपासणी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्यास तयार आहे हा मेसेज घेऊन दोन बडे नेते ‘वर्षा’वर गेले होते : प्रियम गांधी
- पुण्यात नोटिशीला न जुमानता मनसेचा ‘हायव्होल्टेज’ मोर्चा, कार्यकर्ते रस्त्यावर !
- “चंगू मंगू च्या फालतू गप्पा ऐकण्यात आम्हाला रस नाही”
- …म्हणून रोहित शर्मा भारतात परतला; ऑस्ट्रेलिया विरोधात भारताची वाट अधिक खडतर
- कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून डाॅक्टरांना लाथा-बुक्क्यांनी चोप !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

