पुणे : टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.राजकीय पटलावर देखील सध्या वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढीव वीजबिल माफीसाठी आक्रमक झाली असून राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटमचा कालावधी देखील पूर्ण झाला आहे.
त्यामुळे मनसेने राज्यातील विविध शहरात आंदोलनाची हाक दिली होती. आज हे आंदोलन करण्यात येत असून ठिकठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, नाशिक, पनवेल आदी शहरांत मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. मात्र, या सर्वच शहरात मनसेच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कर्त्याकर्ते आणि पोलिसांत संघर्ष सुरु असल्याचं दिसून येत आहे.
पुण्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चाला पोलिसांकडून परवानगी दिलेली नाही पण महाराष्ट्र सैनिकांनी पोलिसांना चकवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पायी मोर्चा सुरू केला आहे. दरम्यान, पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पुणे पोलिसांनी मोर्चा सुरु होण्याच्या आधीच नोटीस दिलेली आहे. तरीदेखील कोणत्याही नोटीसीला न जुमानता मनसेने मोर्चा काढला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून डाॅक्टरांना लाथा-बुक्क्यांनी चोप !
- मोर्चाला परवानगी नाकारली : ‘हे नपुंसक सरकार मनसेला घाबरते’, मनसे आक्रमक
- इंदुरीकर महाराजांच्या खटल्यासाठी नवीन सरकारी वकिल नियुक्त!
- केंद्राच्या संमतीशिवाय यापुढे राज्यांमध्ये लॉकडाऊन नाही; गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
- केसेस दाखल झाल्या तरी चालतील, सरकारला झटका देणारच; मनसे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

