मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (३ मार्च) सुरू झाले आहेत. मात्र पहिलाच दिवस घोषणा आणि गोंधळानी सुरु झाला आहे. भाजप नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यावरच आंदोलन करण्यात येत आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल अशी ग्वाही दिली आहे.
“आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल. महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देतो.”, असे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.
आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल; महाविकासआघाडी सरकारच्या वतीनं सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देतो. pic.twitter.com/ChEmWuXvE6
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 3, 2022
दरम्यान आज पहिल्याच दिवशी अधिवेशनात राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात मविआ सरकारकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं अभिभाषण पटलावर ठेवत भाषण न करताच ते निघून गेले. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात ठराव आणणार असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे आजच्या अधिवेशनात त्यांचा निषेध करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
VIDEO : विराटला १००व्या कसोटी सामन्यासाठी सचिन तेंडुलकरकडून विशेष शुभेच्छा
State Budget Session 2022 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन
विराट कोहलीच्या १०० व्या कसोटी सामन्यासाठी गांगुली उपस्थित राहणार का नाही? आली मोठी अपडेट


