🕒 1 min read
मुंबई: आजपासून (३ मार्च) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. भाजपने विविध विषयांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पहिल्याच दिवशी मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी (Nawab Malik resignation demand) भाजपकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन (Movement of BJP MLAs on the steps of Vidhan Bhavan) सुरु आहे. यावेळी भाजपकडून “दाऊद के दलालो को, जूते मारो सा**” अशा घोषणाही देण्यात आल्या.
दरम्यान या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सहभागी झाले आहेत. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात पोहचले असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी वाहनाचं सारथ्य सांभाळले.दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित आहेत.
दाऊद के दलालो को, देश के गद्दारो को, मंत्रिमंडळ से हकालो इन गुलामो को…. pic.twitter.com/xGPz9oI4ry
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 3, 2022
दरम्यान आजच्या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, नवाब मलिक यांचा राजीनामा, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण,शेतकऱ्यांची वीजबील माफी अशा विविध मुद्यांवरून भाजप ठाकरे सरकारला घेरू शकते.
महत्वाच्या बातम्या:
-
“सरकार चांगलं काम करतंय म्हणून अनेकांना अस्वस्थता”, शरद पवारांचा भाजपवर निशाणा
-
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी किरीट सोमय्या दिल्ली दरबारी; चर्चांना उधाण
-
“… आणि आम्ही ४ तास गप्पा मारल्या” विराट कोहलीसोबत भेटीच्या आठवणींचा जेमिमाहने केला खुलासा
- “स्वतःचे तोंड लपवण्यासाठी विरोधक विधिमंडळात गोंधळ घालणार”, संजय राऊतांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
