🕒 1 min read
मुंबई : इडीने सकाळी नवाब मलीकांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. इडीने चौकशी केल्यानंतर त्यांना कोठडी सुनावली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्रालयाजवळ असलेल्या महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ धरण आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात केले गेले.
इडीने नवाब मलीकांना ताब्यात घेतल्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वाद-विवाद तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. यामध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी नवाब मलीकांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. भाजप महाराष्ट्रात सुडाच राजकारण करत आहेत असा टोला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मारला होता. त्यामुळेच नवाब मालिकांना ताब्यात घेतल्यापासून चौकशी सुरु आहे. माहितीनुसार इडीकडे तक्रार जेष्ठ नागरिकाने केली होती. यामध्ये नवाब मलीकांवर अनेक आरोप केले.
नवी तक्रार –
महाविकास आघाडी सरकारने आणि किरीट सोमय्या यांनी फक्त घोटाळे केले आहेत असे आरोप होत भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच जुगलबंदी झाली आहे. तसेच नवाब मलीकांवर जागेच्या खरेदीचा आरोप केला गेला. या कारणाने ताब्यात घेतले गेले. आणखी चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले आहे अशीही माहिती मिळाली आहे. यासोबतच चौकशी सुरु असताना, एका वयोवृद्ध व्यक्तीने आणखी एक तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीत नवाब मालिकांनी एका जागेवर जबरदस्त कब्जा केला आहे असे तक्रारीत सांगितले.
इडीने हि तक्रार नोंद केली आहे. त्यांनी सर्व कागदपत्रे जमा केले आहेत असेही सांगितले आहे. या कारणाने इडीने सकाळी त्यांच्या घरी जाऊन नवाब मालिकांना ताब्यात घेतले आहे. सध्या देशातले राजकारन तापले आहे. या पाश्वर्भूमीवर नवाब मालीकांनी राजीनामा द्यावा असा भाजपाकडून निषेद नोंदविला जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
