दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देखील विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वात दिल्ली सीमेकडे कूच करत आहेत.
तर, राज्यातील शेतकरी नेते देखील आक्रमक झाले असून हा कायदा अंबानी-अदानी यांच्यासारख्या उद्योजकांच्या फायद्यांसाठी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, शेकाप आदी समविचारी शेतकरी संघटनांनी अंबानी-अदाणींच्या कार्यलयावर मोर्चा देखील काढला होता.
आता, गेल्या 28 दिवसांपासून दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व सहभागी होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेचे नेते रविकांत तुपकर आज कार्यकर्त्यांसह दिल्लीतील सिंघू व गाजीपुर बॉर्डरवर पोहचले आहेत. सिंघू बॉर्डरवरील आंदोलक शेतकऱ्यांनी तुपकरांचे जोरदार स्वागत केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना रविकांत तुपकरांनी आपल्या तडाखेबाज शैलीत संबोधित केले.
सिंघू बॉर्डरवर अनेक युवकांनी स्वतःच्या रक्ताने पंतप्रधान यांना पत्र पाठविण्याचा सपाटा लावला आहे. या युवकांचीही त्यांनी भेट घेतली. तसेच गाजीपुर बॉर्डरवर उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची तुपकरांनी भेट घेतली व आंदोलनात सहभागी झाले. ‘हे आंदोलन फक्त पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांचे नसून महाराष्ट्रातील शेतकरीही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे’, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
‘शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कराल तर केंद्र सरकारला महागात पडेल..सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. दिल्लीतील आंदोलनावर जर लवकरात-लवकर तोडगा काढला नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जथ्थेच्या-जथ्थे दिल्लीत दाखल होतील,’ असा इशारा यावेळी रविकांत तुपकरांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- दोस्त दोस्त ना रहा! ‘त्या’ नगरसेवकांना राष्ट्रवादीने प्रवेश देऊन दुर्दैवी पायंडा रचला; काँग्रेसची जाहीर नाराजी
- ‘सदाभाऊ, साहेबांच आत्मचरित्र वाचण्याआधी, कोंबड्यांच कुक्कुटपालन कस करायचं याचा नीट अभ्यास करा’
- सत्तासुंदरी हातातून गेल्याने भाजपच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे; शेट्टींचा पलटवार
- ‘मनसेच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही; संभाजी हे नाव आमच्या हृदयात आहे’
- ‘पवारांच्या बर्थ-डे पार्टीला अदानी-अंबानी यांच्यासह मुख्यमंत्रीसुद्धा होते, मात्र कोरोना तिथे फिरकला सुद्धा नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

