बीड : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब व अन्य राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.
दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी कायद्यांना समर्थन देण्यासाठी किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली. 24 डिसेंबरपासून ही यात्रा सुरू झाली असून 27 डिसेंबर रोजी या यात्रेची सांगता होणार आहे. भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सांगलीच्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून ही यात्रा सुरू झाली असून, या यात्रेची सांगता इस्लामपूर येथे एका जाहीर सभेने होणार आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.
शरद पवार तुम्ही जास्त खोट बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात, असं टीकास्त्र सदाभाऊ खोतांनी सोडलंय. पवार साहेबांचे मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय. मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात आणि मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केलीय.
आता सदाभाऊंवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. ‘सदाभाऊ, तुम्ही साहेबांच आत्मचरित्र वाचण्याआधी, कडकनाथ कोंबड्यांच कुक्कुटपालन कस करायचं याचा नीट अभ्यास करा..’ अशी बोचरी टीका बीड जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह पंडित यांनी केली आहे.
सदाभाऊ, तुम्ही साहेबांच आत्मचरित्र वाचण्याआधी, कडकनाथ कोंबड्यांच कुक्कुटपालन कस करायचं याचा नीट अभ्यास करा.. https://t.co/1rcW9bZKnf
— Vijaysinh Pandit (@VijaysinhPandit) December 24, 2020
महत्वाच्या बातम्या
- दोस्त दोस्त ना रहा! ‘त्या’ नगरसेवकांना राष्ट्रवादीने प्रवेश देऊन दुर्दैवी पायंडा रचला; काँग्रेसची जाहीर नाराजी
- ‘मेटेंना सामान्य ज्ञान हवं; मागासवर्गीयांसाठी पुढाकार घेणं म्हणजे इतरांना विरोध असं नाही’
- सत्तासुंदरी हातातून गेल्याने भाजपच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे; शेट्टींचा पलटवार
- ‘मनसेच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही; संभाजी हे नाव आमच्या हृदयात आहे’
- ‘पवारांच्या बर्थ-डे पार्टीला अदानी-अंबानी यांच्यासह मुख्यमंत्रीसुद्धा होते, मात्र कोरोना तिथे फिरकला सुद्धा नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

