औरंगाबाद : शहरातील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षातील कुठल्याही अध्यक्षांना, नेत्यांना विचारात न घेता हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यात पुन्हा एकदा गरिब जनताच भरडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीचा या लॉकडाऊनला सक्त विरोध आहे. याबाबत पक्षातील वरिष्ठ नाना पटोले, अमित देशमुख यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सोबतच सुभाष देसाई, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील ऑनलाईन निवेदन पाठवून लॉकडाऊनबाबत फेरविचार करण्यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे काँग्रेसचे औरंगाबाद शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना सांगितले.
दररोज शहरात हजारांच्या पुढे रुग्णसंख्या निघत आहे. संपूर्ण शहर हॉटस्पॉट होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असतांना औरंगाबाद शहरात ३० मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. ३० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत हा लॉकडाऊन लागू असेल. लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकाने, दूध, भाजी देखील दुपारी १२ पर्यंतच उपलब्ध होणार आहे. त्यानंतर मात्र सर्व गोष्टी बंद केल्या जातील.
याविषयी पुढे बोलतांना उस्मानी म्हणाले, हा निर्णय घाईगडबडीत घेतला आहे. एवढ्या मोठ्या शहराचा निर्णय त्या शहरातील लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करुन घ्यायला हवा होता. हा लॉकडाऊन रद्द करावा अथवा सर्वांच्या संमतीने, चर्चेअंती ठरवावे. दुकानात जाऊन सामान घेण्यासाठी हातावर पोट भरणाऱ्यांकडे पैसे तर हवेत ना? दानशूर व्यक्ती परत मदत करतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या
- होळी न खेळण्याचं आवाहन अक्षय कुमारच्या अंगलट ; नेटकऱ्यांनी झापलं
- ‘दीपाली चव्हाण प्रकरणी खा.राणा यांनी वनमंत्र्यांना पत्र पाठवले होते,मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले’
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली शरद पवारांची फोनद्वारे विचारपूस !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

