सिंधुदुर्ग – पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले. ते समाजमाध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना केले.
महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत. दिवाळीनंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे पण तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही, दुसरी तिसरी लाट येऊ शकते. कृपा करून सगळं सुरू केलं म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही हे लक्षात घ्या असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी साधलेल्या संवादावर भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. ‘कालचं मुख्यमंत्र्याचे फेसबुक लाईव्ह इतके फालतू होते की आता लोकचं शिव्या घालतायत. महाराष्ट्राच्या एकही प्रमुख विषयाला हात घातला नाही पण नुसती तीच सडलेली बडबड. महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की इतका बिनकामाचा आणि अक्कलशून्य मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदाच मिळाला.’ अशी जळजळीत टीका राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
कालचं मुख्यमंत्र्याचे फेसबुक लाईव्ह इतके फालतू होते की आता लोकचं शिव्या घालतायत. महाराष्ट्राच्या एकही प्रमुख विषयाला हात घातला नाही पण नुसती तीच सडलेली बडबड. महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की इतका बिनकामाचा आणि अक्कलशून्य मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदाच मिळाला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 23, 2020
महत्वाच्या बातम्या
- शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू : हसन मुश्रीफ
- ‘अजित दादा, आपण ठाकरेंसारखं निव्वळ फोटोसेशन न करता विधिवत पूजा कराल अशी आशा बाळगतो’
- पदवीधर व शिक्षक निवडणुकांच्या निकालानंतर राज्य सरकार पडणार – प्रवीण दरेकर
- मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही : मनसे
- मुंबई पोलिसांच्या सलग तिसऱ्या समन्सला कंगणाने दाखवली केराची टोपली?


