मुंबई : राज्यात कोरोना आटोक्यात आल्यामुळे राज्यभरात शिवजयंती दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, कोरोना पुन्हा एकदा बळावत असल्याचं कारण देत शिवजयंतीवर ऐनवेळी निर्बंध घालण्यात आल्याने भाजप, मनसेसह इतर संघटनांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
तर दुसरीकडं, विविध पक्षांचे मोर्चे, आंदोलने सर्रास सुरु असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे शिवभक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकारवर टीका शिवसेना नेते व मंत्री सुभाष देसाई यांनी देखील विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शिवसेनेने भिवंडीतील बंद पडलेला शिवजयंती उत्सव चालू करून दाखवला.’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
तर, ‘कोरोना हा अजून पूर्णपणे गेलेला नाही. हजारो लोकं या रोगाला बळी पडली. हे निर्बंध खबरदारी म्हणून आहेत. शिवजयंतीला कोणी विरोध कसा करू शकेल ? शिवभक्तांचं सरकार असल्यामुळे शिवजयंतीला विरोध नाही तर सावध होण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोणीही नको ती नाटकं करू नयेत,’ असा टोला देखील सुभाष देसाई यांनी लगावला आहे.
‘प्रदेशाध्यक्षांच्या मिरवणुकीला कोरोना नसतो मात्र शिवजयंती वेळी कोरोना समोर येतो !’
दरम्यान, ‘‘प्रदेशाध्यक्षांची मिरवणूक असेल तर कोरोना नाही. मात्र अधिवेशन असेल तर कोरोना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी कोरोना आहे. अधिवेशनाची वेळ आली की सरकारमधील मंत्री लगेच कोरोना वाढतो आहे, असं सांगतात आणि लॉकडाऊनची भाषा करु लागतात,’ अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ‘हा कोरोना एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वेगाने रंग बदलतोय,’ असा मिश्किल टोला देखील त्यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबातील निकालांमुळे भाजपला धक्का; अमित शहांनी घेतली तातडीची बैठक
- भाजपच्या सर्व संचालकांना घरी बसवणार : आ. आंबादास दानवे
- ‘मौत का कुआँ’ बनलेल्या ‘त्या’ विहिरीजवळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचेही काम सुरू
- शुद्धीवर न आलेल्या महिलेची आखेर ओळख पटली; गुढ मात्र कायम
- ‘चिनीसैन्य माघार घेत असल्याचा उत्सव म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेची बनवाबनवीच’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

