जालना : जालना- देऊळगाव राजा महामार्गावर जामवाडीजवळ वनवे वाहतूकीमुळे एका विहिरीत दोन कार जाऊन चार जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर प्रशासनाने वेगाने हालचाल करत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे रखडलेले काम सुरु केले आहे. या ठिकाणी एका हॉटेल व्यावसायिकाने रस्त्याच्या कामाला विरोध केला होता. मात्र, डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी बैठक घेऊन संबंधित व्यावसायिकाला समज दिली. त्यानंतर हे काम सुरू करण्यात आले आहे.
जालना ते देऊळगाव राजा या पंचवीस किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आजही रस्त्याचे छोटे-छोटे तुकडे अर्धवट अवस्थेत आहेत. पुलांचे देखील काम सुरू आहे. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना या रस्त्यावर नाही. त्यामुळे लहान-मोठे अनेक अपघात या मार्गावर होतात.
दोन वेळा कार विहिरीत जाऊन चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर बांधकाम विभागाने याठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले आहेत. शिवाय विहिरीजवळ रस्त्याच्या कडेने असलेला मातीचा ढिग काढून त्याठिकाणी लोखांडी पोल आणि दोन्ही बाजूंनी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- परभणी, हिंगोली जिल्ह्याने चाचण्या वाढवाव्यात; विभागीय आयुक्तांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- जालन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, जिल्हाभरात कलम ४४ लागू, मोर्चाला परवानगी नाही
- राज्यातील २८ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट
- नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक; आरोपीला हिंगोली पोलिसांच्या बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

