Share

शुद्धीवर न आलेल्या महिलेची आखेर ओळख पटली; गुढ मात्र कायम

Published On: 

बीड : मध्यरात्री गस्त घालत असलेल्या पोलिसांना सापडलेल्या जखमी महिलेची ओळख पटवण्याच्या कार्यात यश आले आहे, पण सदर महिला आजूनही शुद्धीवर न आल्याने तिच्या बेशुद्ध होण्यामागे खरे कारण काय हे गुढ मात्र कायम आहे. बुधवारी तिच्या कुटूंबीयानी स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात येऊन तिची ओळख पटवून घेतली.

१६ फेब्रुवारी रोजी आंबाजोगाई शहराजवळील मानवलोक परिसरात रिंग रोड येथे मध्यरात्री पेट्रोलींग करत होते. एक वाजेच्या सुमारास पोलिसांना एक अनोळखी महिला जखमी व बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेली आढळली. पोलिसांनी तिला तत्काळ स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात दाखल केले. बुधवारी तिची ओळख पटली असून, ही महिला आंबाजोगाई शहरातील आसून महिलेचे नाव मंगल दत्तात्रय शेंगुळे असल्याचे तिचा दीर सुनील शेंगुळे यांनी सांगितले.

सुनील शेंगुळे यांच्या सांगण्यानुसार मनल शेंगुळ या मागील दोन दिवसापासून बेपत्ता होत्या. मंगल शेंगुळे या मध्यरात्री रिंगरोड परिसरात कशाला गेल्या होत्या. का त्यांना कोणा मारहाण करुन तिथे टाकून देण्यात आले होते, की त्यांचा अपघात झाला, याबाबत मात्र गुढ कायम आहे. याचा उलगडा मनल शेंगुळे शुद्धीवर अल्यानंतर होईल असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. पोलिस त्यांच्या शुद्धीवर येण्याची वाट पहात आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!