Share

भाजपच्या सर्व संचालकांना घरी बसवणार : आ. आंबादास दानवे

Published On: 

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राज्य पातळीवर यशस्वी झालेला महाविकासआघाडीचा फॉर्मुला वापरणार असा निर्णय घेतला आहे, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांनी घेतला आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार आंबादास दानवे यांनी सांगितले. भाजपच्या सर्व संचालकाना घरी बसवण्यासाठी जिल्हा बँक निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय महाविकासआघाडीतील पक्षांनी घेतला आहे असे , आमदार दानवे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी सांगितले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका एकत्र लढविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला आहे. औरंगाबाद जिल्हा बँकेवर काँग्रेस पक्षाचे सुरुवातीपासून वर्चस्व राहिले आहे. राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असताना भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनीही बँकेच्या संचालक मंडळात स्थान मिळवले होते. यावेळी बागडेंनी नितीन पाटील यांना भाजपच्या गोटात आणले होते.

येत्या २१ मार्च रोजी जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होईल, असे सांगितले होते. परंतु असे काही होणार नाही, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व संचालकांना घरी बसवण्यासाठी रणनीती आखली आहे, असे आमदार दानवे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!