Share

‘या सरकारला अजून अक्कल येत नाही आणि येईल अशी खात्री सुद्धा नाही’

Published On: 

रत्नागिरी : आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहे.

मुंबई मेट्रो-3च्या कांजूरमार्गमधल्या कारशेडच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे. सध्या परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. एमएमआरडीएला देखील तातडीनं काम थांबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

यानंतर महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांनी आगपाखड केली आहे. फडणवीस सरकार काळात आरे येथील कारशेडच काम सुरु करण्यात आलं होतं. मात्र या कामास स्थानिकांसह पर्यावरण प्रेमींचा विरोध होता. हा वाढत विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, कांजूरमार्ग येथील जमिनीचा वाद पेटला आहे.

आता, भाजप नेते निलेश राणे यांनी रखडलेल्या विकासकामांवरून व मेट्रोच्या कामाला होणाऱ्या विलंबावरून ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मुंबई मेट्रो कारशेड प्रकल्प ठाकरे सरकारच्या इगो मुळे रखडला जातोय. उच्च न्यायालयाने आज ठाकरे सरकारला मोठा झटका देत प्रकल्पाला स्थगिती दिली. करोडो रुपयांची वाट लावत ठाकरे सरकारने लोकांच्या पैशाचा चुराडा केला. या सरकारला अजून अक्कल येत नाही आणि येईल अशी खात्री सुद्धा नाही.’ अशी टीका राणेंनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!