Share

‘उद्धव ठाकरे डरपोक, हिंमत नसलेले पहिले मुख्यमंत्री’

Published On: 

रत्नागिरी : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन काल संपुष्टात आलं. या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. विरोधकांनी हे अधिवेशन सुरु होण्याआधीच सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. काल देखील भाजप नेत्यांनी सरकारवर आरोपांची सरबत्ती केली.

तर, जनतेच्या प्रश्नासाठी २ दिवसांचं अधिवेशन पुरेसं नाही त्यामुळे हे या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी केली जात होती. यावर खुद्द विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील अधिवेशन कालावधीवर नाराजी व्यक्त केली होती. दोन दिवसांचं हिवाळी अधिवेशन काल समाप्त होण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समारोपाचं भाषण केलं. या भाषणावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला.

उद्धव ठाकरेंच्या या भाषणावर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण नेहमीप्रमाणे तेच तेच, दोन तीन शब्द इकडे तिकडे, फोडणी नसलेलं बेचव भाषण. सभागृह जास्त दिवस चालवायची हिम्मत नसलेले उद्धव ठाकरे पाहिले मुख्यमंत्री असतील. खरं कौशल्य सभागृहात दाखवायचं असतं पण ते उद्धव ठाकरेंना कधी जमणार नाही कारण ते डरपोक आहेत.’ अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी ट्विटवरून केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!