Share

‘…हे खेळच सांगेल’ ; WTC फायनलपूर्वी कर्णधार विल्यम्सनने दिला जिंकण्याचा इशारा

Published On: 

इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला काही तसाच उरले आहेत. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. भारतीय संघाने या महामुकाबल्यासाठी ११ शिलेदारांची घोषणा केली आहे.

अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचं ठरवलं आहे. संघात इशांत शर्मा मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांना अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळली. तसेच सामन्यापूर्वी विराटने जिंकण्याचा विश्वास दाखवला आहे.

तर फायनल सुरु होण्यापूर्वीच न्यूझीलंडच्या संघाने हार मानल्याचे दिसत आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने एक विधान केले आहे. फायनलपूर्वी विल्यम्सन म्हणाला की, ‘भारत हा एक सर्वोत्तम संघ आहे. भारताचा संघ मजबूत देखील आहे. या संघाने आत्तापर्यंत सातत्याने विजय मिळवले आहेत, त्यामुळेच ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत. दमदार कामगिरीमुळेच ते अंतिम फेरीत पोहोचण्याच्या लायक आहे. त्यामुळे हा सामान चांगलाच रंगेल, अशी मला आशा आहे. या अजिंक्यपदाचा प्रबळ दावेदार नेमका कोण आहे, हे खेळच सांगेल.’

विल्यम्सनने पुढे म्हणाला, ‘न्यूझीलंड संघानेही चांगली प्रगती केली आहे. संघापुढे बरीच आव्हानं आली तीही आव्हान आम्ही पार करत फायनलपर्यंत पोहोचलो आहोत. सध्याच्या घडीला आम्ही चांगल्या फॉर्ममध्ये आहोत आणि हाच फॉर्म आम्हाला फायनलमध्येही कायम ठेवायचा आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!