Share

हे श्रेय मुख्यमंत्री व राज्य सरकारचे ; श्रेयवादावरुन शिवसेनेचा घणाघात

Published On: 

मुंबई : ‘सामना’तील अग्रलेखात भाजप आमदार राम कदम, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांना नाव न घेता टोले लगावण्यात आले आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले. मात्र, सर्व श्रेय आमचेच, असा गोंधळ सुरु करुन भाजपमधील ‘उपऱ्यां’नी विजयोत्सव सुरु केला.

मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दारी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वैगैरे लावत पोहोचले. ज्यांचा भाजपशी किंवा हिंदुत्वाच्या विचारधारेशी काडीमात्र संबंध नव्हता असे बाजारबुणगे सत्तेसाठी भाजपमध्ये घुसले. ते उपरेच देवाच्या दारात श्रेयवादाचा गोंधळ घालत आहेत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

देशामध्ये आजही कोरोना अस्तित्वात आहे. राज्यातही बऱ्याच ठिकाणी अनेक रुग्ण आहेत. हे रुग्ण कमी कसे करायचे, यासाठी आमचे सरकार सतत प्रयत्न करीत होते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट हळूहळू उघडायची आणि कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू द्यायची नाही, असा आमचा प्रयत्न आहे.

राज्यातील धार्मिक स्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात आले आहेत. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर त्यावरून श्रेय घेण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. भाजपने काही ठिकाणी आज आनंदोत्सव साजरा केला. भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करतय. तसेच मंदिर उघडण्याचे श्रेय भाजपला जाऊच शकत नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!