Share

…त्यांनी माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले- झिशान सिद्दिकी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. बांद्रा पश्चिम भागातले काँग्रेस नेते झिशान सिद्दिकी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार करणारे एक पत्र सोनिया गांधी यांना लिहिले आहे.

झिशान पत्रात म्हणाले आहेत की, ‘मुंबईत १४ नोव्हेंबर रोजी एक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीदरम्यान भाई जगताप यांनी माझ्याशी गैरवर्तणूक केली. त्यांनी माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. मला धक्काबुक्की केली आणि शेकडोंच्या गर्दीसमोर माझा अपमान केला. त्यावेळी पक्षाची प्रतिमा अबाधित राखण्यासाठी मी काही बोललो नाही. पण माझी मागणी आहे भाई जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी.’

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसने मोदी सरकारविरोधात एका पदयात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेदरम्यान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, युथ काँग्रेसचे अध्क्ष झिशान सिद्दिकी आणि युवा नेता सूरज सिंह ठाकूर यांच्यात राजगृहामध्ये जाण्यावरुन वाद झाले होते. झिशान सिद्दिकी यांनाही आत जायचं होतं, परंतु त्यांना जाऊ दिले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!