राजापूर: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी रिफायनरीवर भूमिका स्पष्ट केली आहे. म्हणाले, कोणताही प्रकल्प होत असताना स्थानिक लोकं महत्त्वाची आहेत. लोकांची इच्छा आणि होकार असेल तर नक्की पुढे जाऊ. लोकांचा विश्वास जिंकूनच आपल्याला पुढे जायचं आहे. लोकांना डावलून पुढे जायचं नाही, असं सांगतानाच नानारमध्ये रिफायनरी होणार नाही, असे सांगितले.
आदित्य ठाकरे या प्रकल्पाबाबद सांगताना म्हणाले धोपेश्वरमध्ये लोकांशी चर्चा केली जाईल. कुठेही प्रकल्प झाला तरी हरकत नाही. फक्त विकास झाला पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. विदर्भात रिफायनरी प्रकल्प नेण्याची भाजपकडून मागणी होत आहे. या संदर्भात प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्याकडे समृद्धी मांजरेकर आणि संगीता बाणे या दोन महिलांनी रिफायनरी समर्थनाची बाजू थेट मांडली. लोकांच्या मनात जे आहे ते डावलून पुढे जाणार नाही. सर्वांना सोबत घेऊन हा प्रश्न सोडवू चांगले काही होत असेल तर नक्की करू. तुम्ही सर्व लोकं हो बोलला तरच आपण पुढे जाऊ, असंही आदित्य यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
“विखेंना भाजपमध्ये मान मिळतो की नाही…” – छगन भुजबळांचा विखेंना टोला
“…याचे उत्तर ६४० कसं येतं डॉक्टर नितीन राऊत साहेब?”, आधुनिक भास्कराचार्य म्हणत भातखळकरांचा टोला
”मला हे सांगायचं नव्हतं..” विवेक अग्निहोत्रींचा वरुण धवन विषयी मोठा खुलासा
“शरद पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले”, सदाभाऊ खोत यांचे खळबळजनक वक्तव्य
“प्रदूषण होणार नसेल तर रिफायनरीला मान्यता देऊ” – आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

