मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
कोरोन महामारीची हीच गंभीर परिस्थिती संपूर्ण देशावर आलेली आहे. भारतात एका दिवसाला सुमारे दीड लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
३८५ दिवसातही कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकता आलेलं नाही. उत्सव, टाळ्या-थाळ्या आता खूप झाल्या. आता लोकांना व्हॅक्सीन द्या, असा खोचक टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. सरकारच्या धोरणांमुळेच देशातील प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दुसरीकडे लसींची कमतरता जाणवत आहे. शेतकरी-मजदूर संकटात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. छोटे उद्योग धंदे बंद होत आहेत. मध्यमवर्गही त्रस्त झाला आहे, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
385 दिन में भी कोरोना से लड़ाई नहीं जीत पाए- उत्सव, ताली-थाली बहुत हो चुके अब देश को वैक्सीन दो! #SpeakUpForVaccinesForAll pic.twitter.com/YkIb3yDTGO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 12, 2021
दरम्यान दिल्लीमध्ये देखील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र दिसत आहे. ‘कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे दिल्लीत अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकांचे चांगले सहकार्य मिळाले आणि रुग्णालयातील स्थिती नियंत्रणात राहिली तर लॉकडाऊनची गरज पडणार नाही. पण स्थिती हाताबाहेर गेली तर लॉकडाऊन लावावा लागेल,’ असा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, ते बदलू आपण; फडणवीसांच्या विधानाने खळबळ
- ई-कॉमर्स व्यापारासह सरसकट लॉकडाऊन करा, अन्यथा…पुण्यातील व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- लॉकडाऊन अटळ : आता गरिबांना मदत कशी करता येईल याविषयी चर्चा सुरु
- लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा, भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ‘पृथ्वीराज चव्हाण वैफल्यग्रस्त, मोदींवर ओढून-ताणून टीका’, भाजपचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

