मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस विरोधकांनी गाजवला. पालघर येथील आरोग्यसेवा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निधी वाटपातील दुजाभाव आदी विषयावर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. आपण मंत्रीमंडळात एकत्र असताना जी कामं आपण केली, त्याला तुम्ही आता स्थगिती देणं हे वागणं बरं नव्हं. कधी कुणावर काय प्रसंग येईल हे सांगता येत नाही. सगळे दिवस सारखे नसतात. कधी आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागेल, सांगता येत नाही. त्यामुळे असं करू नका, असं अजित पवार म्हणाले.
आपण आत्ताच्या पुरवणी मागण्यांमध्ये आपल्या ४० आमदारांना ५० कोटींची कामं दिली आहेत. शिंदे गट, तुमचा गट, तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा. भाजपानं देखील आपल्या आमदारांसाठी ५०-५० कोटींची कामं घेतली. पण असा दुजाभाव करू नका. कारण जिथं नुकसान व्हायचं तिथे ते झालंच आहे. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान मतदारसंघ बघून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचा मतदारसंघ असं काही नुकसान झालेलं नाही. सगळीकडेच नुकसान झालं आहे. त्यामुळे मदतनिधी देताना थोडं खुलं धोरण ठेवा, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | AK-47 असलेली बोट कुठून आली?; देवेंद्र फडणवीसांनी दिले संशयास्पद बोटीचे तपशील
- Breaking News | संशयास्पद बोटीत AK-47 आणि गोळ्यांचे बॉक्स; चौकशीसाठी स्पेशल पथक नेमण्याची तटकरेंची मागणी
- Breaking News | हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट; बोटीत AK-47 आणि गोळ्यांचे बॉक्स
- Nitish Kumar | “आमचे नाते खूप जुने…”: लालू यादव यांच्या भेटीनंतर नितीश कुमार यांचं वक्तव्य
- Assembly Session 2022 | महाराष्ट्राच्या इतिहासात शिंदे हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले – छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

