नवी दिल्ली : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह महाराष्ट्रात विविध उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांची दमछाक होत आहे. दरम्यान जगभरातील संशोधक, तज्ज्ञ मंडळी कोरोनावर संशोधन करत आहेत. भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे.
यामुळे अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांवर ताण वाढत असून ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन यांच्यासह कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी महत्वाचे असलेल्या लसींचा देखील तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या तुलनेत कमी लस मिळाल्यामुळे काही दिवसांपूर्वी नाईलाजाने लसीकरण बंद करावे लागले होते. आता हा पुरवठा सुरळीत झाल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, देशात लसींचा तुटवडा नसल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. ‘लसीकरणासंदर्भात वैज्ञानिकांशीही चर्चा सुरू आहे. कोरोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. कोरोना संक्रमण प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं लढा देणं थोडं कठीण आहे. पण, मला विश्वास आहे की, आपण त्यावर विजय मिळवू.’ असं ते म्हणाले.
यासोबतच, ‘आपल्या लसीकरण कार्यक्रमाचा वेग जगात सर्वाधिक आहे. पहिल्या दहा दिवसांत भारतात उच्चांकी लोकांचं लसीकरण केलं गेलं. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसमध्ये काही दिवसांचं अंतर असलं पाहिजे. त्यामुळे दुसरा डोस देण्याचा कार्यक्रमाला वेगवान केलं जाऊ शकत नाही. लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वृत्ताशी मी सहमत नाही,’ असं अमित शाह यांनी स्पष्ट केले.
- श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनवर चेन्नईत करण्यात आली अँजिओप्लास्टी
- ‘गोकुळ’मध्ये महाडिक गटाचा राष्ट्रवादीला धक्का; एकमेव संचालकाचा सत्ताधारी गटात प्रवेश
- ब्रेक द चेन! जालना जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंतच किराणा, भाजीपाला विक्री
- ‘या’ राज्यांमधून महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास RTPCR चाचणी बंधनकारक !
- तळीरामांना कोरोना लवकर होतो असं म्हणतात; फडणवीसांच गायकवाडांना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

