Share

कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही – उर्मिला मातोंडकर

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतचे मागील काही दिवसांपूसन राजकीय वाद चालू आहेत. या वादादरम्यान कंगणाच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली होती कंगनाचे कार्यालय तोडण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि कंगनाचे महाराष्ट्र सरकारवर टीका यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले होते. या रागातूनच ही कारवाई केल्याचा आरोप कंगनाने केला होता.

तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. यानंतर शिवसेनेविरुद्ध कंगना असा सामना रंगला होता. यातच तिला वाय प्लस सुरक्षा देखील पुरवण्यात आली होती. आजच, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने शिवसेनेचं शिवबंधन बांधलं आहे. यानंतर तिने पत्रकार परिषद देखील घेतली.

यावेळी तिला कंगना रानौत बद्दल प्रश्न करण्यात आला असता, ‘कंगणा रणौत यांना उत्तर देणार नाही.त्यांच्यावर खूप बोलून झालं आहे, कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. कंगनावर बोलण्याची ही वेळ नाही’ असं म्हणत सद्या तिच्यावर भाष्य करणं टाळलं. मात्र, येत्या काळात कंगना सारख्या महिला सेलिब्रिटींच्या टीकेला चोख उत्तर देण्यासाठी आता शिवसेना अधिक सज्ज झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!