Share

“इथे प्यायला पाणी नाही अन् राज्य सरकारने दारु स्वस्त केली, आता लोकांनी दारु प्यायची का?”

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : जिल्ह्यातील बोदवड येथील नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत भाजपा नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे. बोदवड शहरामध्ये पिण्यासाठी पाणी मिळत नाही, महिलांचे हाल होत असताना मात्र राज्य सरकारने दारु स्वस्त केली, आता लोकांनी दारु प्यायची का? असा सवाल गिरीश महाजनांनी केली आहे.

गिरीश महाजन म्हणाले, महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. राज्यात व जळगाव जिल्ह्यात शेतकर्‍यांना काय नुकसान भरपाई मिळाली. मोठ्यांची नावं रेशनकार्डावर आणि गरजू रेशनकार्डपासून वंचित असे म्हणत महाजनांनी सरकारवर टीका केली.

महाविकास आघाडीच्या काळात गेल्या दोन वर्षांत एकही भरती झालेली नाही. अन जी भरती झाली त्यातही भ्रष्टाचार केला. म्हाडा असो की आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया एकही परीक्षा पारदर्शक झाली नाही.

बोदवड शहरामध्ये पाणी पिण्यासाठी मिळत नाही महिलांचे हाल होत असतात मात्र हे त्यांना दिसत नाही. राज्य सरकारने दारू स्वस्त केली आणि प्यायला पाणी नाही. आता लोकांनी दारू प्यायची का अशा शब्दात महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!