Share

“दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठंय?”; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका

Published On: 

🕒 1 min read

जालना : दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठंय? विना मुख्यमंत्र्याचं कुठे राज्य चालत असतं का? मुख्यमंत्र्याच्या गैरहजेरीत शिवसेनेच्या एका मंत्र्याला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली असती तर हे राज्यं चालल नसतं का? असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते बदनापूर येथे नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते.

पुढे रावसाहेब दानवे म्हणाले, ”हे काय म्हणतात, आमचं कुटुंब आमची जबाबदारी. मुख्यमंत्री परभणीला आले त्यांना हॉटेलवाले भेटले. त्यांनी सांगितले कर्ज काढून हॉटेल बांधले. बॅंकवाले कर्जासाठी चकरा मारत आहेत. आम्हाला पॅकेज द्या. मोदींनी जसं पॅकेज दिलं तसं राज्यातही आम्हाला पॅकेज द्या आणि मुख्यमंत्री म्हणतात आपलं कुटुंब आपली जबाबदारी.

हा मुख्यमंत्री कुटुंबाचा जबाबदार आहे की राज्यातल्या १२ कोटी लोकांचा जबाबदार आहे, हे मला तुम्ही सांगा. असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला. आता तर दोन महिन्यांपासून कुठे आहे पठ्ठ्या हे काहीच सांगू शकत नाही कुणी,” असा टोला रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

यावेळी प्रचार सभेत बोलताना रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. करोना काळात केंद्राप्रमाणे राज्यानेही पॅकेज जाहीर करायला हवं होतं. पंतप्रधान मोदी यांनी करोना काळात अन्नधान्याचा साठा किती आहे, याची विचारणा केली होती. देशात दोन-तीन वर्ष पुरेल एवढा साठा असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी करोना काळात मोफत अन्न धान्य द्यावं, अशी सूचना केली आहे. करोना संकट कायम असेपर्यंत ही योजना सुरू ठेवावी, असेही मोदी म्हणाले होते, असे दानवे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!