🕒 1 min read
अहमदनगर : जिल्ह्यातील प्रवरानगर येथे सहकार परिषद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन शनिवारी केले होते. यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी भाषण केले. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात आमचे सरकार आले तेव्हा लोक म्हणायचे, की यांना सहकारामधले काय कळते. आता सहकाराचे काय होणार, पण आमच्या सरकारने घेतलेले निर्णय सहकाराला अडचणीतून बाहेर काढणारे ठरले. अनेक लोक सहकार चळवळ धोक्यात आहे, असे सांगतात पण असे लोकच खासगी कारखाने काढून बसले आहेत.
सहकारातील कारखाने त्यांनी खासगीत नेले. हे कारखाने त्यांनी कवडीमोल भावाने विकत घेतले. त्या कारखान्यांच्या जमिनींच्या व्यवहारातही पुन्हा घोटाळे झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मालकीचे हे सहकार क्षेत्र खासगी लोकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र चाललेले आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
सहकार अडचणीत आहे याबाबत मी सहमत आहे. सहकाराला मदत करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालय निर्माण केले आहे. सहकारावर अन्याय होणार नाही त्यासाठी पारदर्शी भूमिका घेऊन मदत करण्यात येणार आहे. १०० वर्षं सहकार क्षेत्र टिकविण्यासाठी बदल करावे लागतील. असे अमित शहा म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ”दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठंय?”; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका
- ‘..तर भाजपने आपल्या १०५ आमदारांचे राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी’
- खडसेंनी आता दुकानदारी बंद करावी- गिरीश महाजन
- योगी सरकारचे पाच वर्ष फक्त ‘ट्रेलर’ खरी फिल्म तर..’ नितीन गडकरींनी केले तोंडभरून कौतुक
- …पण ह्या राष्ट्रवादी आमदार राजू नवघरेचं काय करायचं? नितेश राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
