पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आपल्या दृष्टीने हिंदू हा शब्द आपली मातृभूमी, पूर्वज आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रतिशब्द आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहेत असे मानतो. कोणाच्याही मताचा येथे अनादर होणार नाही. परंतु आपणास मुस्लिम वर्चस्वाचा नव्हे तर भारतीय वर्चस्वाचा विचार करावा लागेल’, असे वक्तव्य केले होते. यावरुन राज्यात नवा वाद पेटला आहे. या वादात आता संभाजी बिग्रेडने उडी घेतली आहे.
‘हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते’ असा सरसंघचालक मोहन भागवत यांना साक्षात्कार आहे की दृष्टांत. मग आरएसएसचा ‘सरसंघचालक’ हा मुस्लिमांचा बनवणार का? असा सवाल संभाजी बिग्रेडने उपस्थितीत करत जोरदार घणाघात केला आहे.
https://www.facebook.com/santosh.shinde.33449138/posts/4236540173067157
मग याच आरएसएस आणि हिंदुत्ववादी विचारांनी आजपर्यंत हिंदू-मुस्लीम वाद लावून दंगली का घडवल्या, समाजात सामाजिक तणाव निर्माण करून वातावरण गढूळ का केले? हजारों मुलांचे या धार्मिक दंगलीत जीव गेले मग त्यांना आजपर्यंत का भडकवले गेलं?. का हजारो लोकांचे संसार देशात उद्ध्वस्त केले? कुणाला कोणता धर्म स्वीकारायचा हा अधिकार कायद्याने प्रत्येक भारतीयाला दिलेला आहे, असं म्हणत संभाजी ब्रिगेडने भागवत यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण करणार; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराडांचे आश्वासन!
- ‘भाजपाकडे लाचखोर नवऱ्याची बायको, हे चित्र लोकांना विचित्र वाटते!’, मेहबूब शेख यांचा हल्लाबोल सुरूच
- औट्रम घाटा पाठोपाठ गौताळा घाटात कोसळली दरड; वाहतूक विस्कळीत
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- केंद्राने महाराष्ट्राला दिलेला इशारा गणेश मंडळांनी पाळला पाहिजे – राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

