औरंगाबाद : औट्रम घाटा पाठोपाठ आता कन्नड घाटात दरड कोसाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे औट्रम घाटाला पर्यायी असलेल्या गौताळा घाटातून जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ये जा करणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात पाउस झाल्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहे. त्यातच मागील आठवड्यात झालेल्या चांगल्या प्रमाणातील पावसामुळे औट्रम घाटातील दरड कोसळली होती. त्याचा मलबा हटविण्याचे कार्य सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला वळविण्यात आलेल्या, नागदमार्गावरील गौताळा घाटात मंगळवारी दरड कोसळल्याची माहिती वन विभागाच्या सुत्रांनी दिली.
दरम्यान, यामुळे मालेगाव, धुळे, सुरत, इंदोरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नागदमार्गे पर्यायी वळविण्यात आली होती. त्यात आता गौताळा घाटात पुन्हा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने, पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलिया आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत हीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे – मलिक
- अफगाणिस्तानच्या पंतप्रधान पदी ‘या’ नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
- अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी
- कोस्टल रोडच्या भ्रष्टाचारात शिवसेनेची भागिदारी? एसआयटी मार्फत चौकशीची भाजपची मागणी
- अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटेंची ईडीकडून ८ तास चौकशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

