अहमदनगर : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ८ तारखेला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
आता या शेतकरी आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील पाठींबा दिला आहे. त्यांनी या आंदोलनाला पाठींबा देतानाच मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार खोटारडे आहे. मला दोन वेळा खुद्द पंतप्रधान आणि दोन कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत.’ अशी नाराजी देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.
‘आता सुरू असलेल्या आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी सावध रहावे. हे आंदोलन मोडून काढले गेले तर पुन्हा होऊ शकणार नाही. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचे नाक दाबावे, त्याशिवाय तोंड उघडणार नाही,’ असं आवाहन करत त्यांनी या लढ्याला बळ दिलं आहे. तसेच, जर यातून प्रश्न सुटला नाही, तर आपण शेवटचे आंदोलन करण्यास पुन्हा मैदानात उतरणार आहोत, अशी तयारीही दर्शवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : भारतातील कोरोना लसीकरणाचा मुहूर्त ठरला? केंद्र सरकारची तयारी सुरु!
- नर्सेसच्या रिक्त जागा तातडीने भरल्या जातील, राजेश टोपेंचे आश्वासन
- टाटा मोटर्सच्या गाड्यांवर मिळणार चक्क ‘एवढी’ सूट, हॅरिअर, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर !
- ‘भारत बंद’ला प्रतिसाद मिळणार नाही; रामदास आठवलेंचा दावा
- शेतकरी आंदोलन : उद्याच्या भारत बंद दरम्यान काय सुरू, काय राहणार बंद ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

