🕒 1 min read
नवी दिल्ली : करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून अनेक क्षेत्रांसह क्रीडा क्षेत्रालाही प्रचंड फटका बसला होता. आता यातून बाहेर पडत असताना विविध स्पर्धा सुरू झाल्या असल्या तरीही आता त्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या बायोबबल सुरक्षा व विलगीकरणाच्या नियमांना आता खेळाडू कंटाळले आहेत. स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे का नाही असा प्रश्न ते विचारत असून ही सुरक्षा व विलगीकरण आता नको रे बाबा अशीच मते विविध क्रीडापटूंनी व्यक्त केली आहेत.
यावरच भारतीय क्रिकेट टीमचे माजी मानसिक आरोग्य प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी (Paddy Upton) BCCI (भारतीय क्रिकेट बोर्ड) सह जगातील क्रिकेट टीमचा सविस्तर अभ्यास केला आहे. अधिक काळातपर्यंत जैव सुरक्षित वातावरणात (बायो बबल) राहिल्यामुळे खेळाडूंना मानसिक आजाराची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोना महासाथीदरम्यानही क्रीडा स्पर्धा सुरू झाल्यापासून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणात राहावं लागत आहे. तर अनेक क्रिकेटर आणि टेनिस खेळाडू याचा प्रभावामुळे होणाऱ्या मानसिक स्वास्थ्याबाबत आपलं मत व्यक्त करीत आहेत.
अप्टन पुढे म्हणाले की, क्रीडा टीममधील वरिष्ठ याकडे फारस लक्ष देत नसल्याचं दिसत आहे. पॅडी अप्टन म्हणतात की, सर्व खेळाडूंसाठी हे एक समान आव्हान आहे. दुसरीकडे आम्ही विविध खेळाडूंकडून फिडबॅक घेण्यासाठी शोध केलेला नाही. मात्र आरोग्यासंबंधित लोक म्हणतात की, जोपर्यंत आम्ही परीक्षण करीत नाही, तोपर्यंत आम्ही यासंदर्भात एखाद्या औषधांची परवानगी देऊ शकत नाही.
महत्वाच्या बातम्या :
- टीम इंडियाच्या खेळाडूंना कुटुंबीयांसोबत हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी
- इस्रायली दूतावासाजवळील स्फोटाने दिल्ली पुन्हा हादरली !
- बीडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला; ३३ जणांवर दरोड्याचा गुन्हा
- स्मार्ट सिटी बस संख्या तिप्पट होणार: 200 नवीन बसचा प्रस्ताव
- राज्यात पोलीस भरती दोन टप्प्यांत होणार-गृहमंत्री


