🕒 1 min read
मुंबई: कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे. “फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे. त्यामुळे आमचे फोन अवैधपणे टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात होता. तत्कालीन गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे.”, अशी मागणी नाना पटोले (Allegations of Nana Patole) यांनी केली आहे.
दरम्यान बेकायदा फोन टॅपिंग केल्या प्रकरणी काल (२६ फेब्रुवारी ) पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, त्यात आता नाना पटोले यांनी केलेले आरोप अजूनच धक्कादायक आहेत.
फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे. त्यामुळे आमचे फोन अवैधपणे टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात होता. तत्कालीन गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे. pic.twitter.com/eDCq1PyixQ
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 27, 2022
दरम्यान शुक्ला सध्या हैदराबाद येथे केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. त्यांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅप करून त्या फोनमधील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचा अहवाल शासनाने स्वीकारून फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
“२०२४ साली आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं”, आदित्य ठाकरेंचा दावा
“ईडीने नवाब मलिकांना १५ मिनिटं दिली असती तर…”, जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
PAK vs AUS: तब्बल २४ वर्षांनी कांगारू पाकिस्तान दौऱ्यावर ; हजारो पोलीस सुरक्षेसाठी तैनात
“…म्हणून मुख्यमंत्रीपदाची संधी आम्ही सोडून दिली”, जयंत पाटलांचा खुलासा
- Russia-Ukraine war : युक्रेनहून सुमारे ५०० भारतीय विद्यार्थ्यांना देशात आणले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

