🕒 1 min read
मुंबई : सध्या युक्रेन आणि रशिया या दोन युरोपीय देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO ( नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) मध्ये सहभागी होऊ नये ही व्लादिमीर पुतीन यांची प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीला धरुन रशियाने युक्रेन देशावर आक्रमण केले आहे. युद्ध जरी रशिया आणि युक्रेनमध्ये चालू असले तरी त्याची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. भारताला पण या युद्धाची झळ अप्रत्यक्ष रित्या बसली आहे.
भारत देशातील हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घ्यायला दरवर्षी युक्रेनला जातात. परंतु आता युद्ध चालू असल्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेन देशात अडकले आहेत. कालच भारत सरकारने ५०० भारतीय मुलांना मायदेशी आणले आहे. मात्र युक्रेनमध्ये एक भारतीय तरुणी अशी पण आहे कि तिने भारतात परतण्यास नकार दिला आहे आणि तिच्या या निर्णयामुळे तिचे सर्व ठिकाणांहून कौतुक पण होत आहे. हरियाणा राज्याची रहिवासी असणाऱ्या नेहाने युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमध्ये पण भारतात परत येण्यास नकार दिला आहे. नेहा युक्रेनमध्ये ज्या घरात भाड्याने राहते त्या घराचा मालक रशिया विरुद्धच्या लढाईसाठी युक्रेनमधील सैनिकांना मदत करायला रस्त्यावर उतरला आहे.
मात्र असे करत असताना त्याने आपल्या कुटूंबियाची जबाबदारी नेहा वर सोपवली आहे. नेहा ने सुद्धा त्या कुटुंबामधील ३ मूल आणि त्याची पत्नी यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तिने भारतात पाठवलेल्या निरोपानुसार युक्रेनमध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव होत असून आम्ही जिवंत राहू कि नाही याबद्दल खात्री नसली तरी मी या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आहे. तिच्या या निर्णयाचे जगभरातून कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- आमचे फोन टॅप करण्यात तत्कालीन गृहमंत्र्यांचा हात; फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करावी- नाना पटोले
- “२०२४ साली आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं”, आदित्य ठाकरेंचा दावा
- “मी या देशाचा पंतप्रधान बनून दाखवतो”, अभिजित बिचुकलेंचे मोठे वक्तव्य
- “ईडीने नवाब मलिकांना १५ मिनिटं दिली असती तर…”, जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
- “…म्हणून मुख्यमंत्रीपदाची संधी आम्ही सोडून दिली”, जयंत पाटलांचा खुलासा


