मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. नाशिक पाठोपाठ पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील पोलिसांचे पथक रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी त्यांना संगमेश्वरमध्ये येथून ताब्यात घेतलं आहे.
नारायण राणेंच्या अटकेनंतर आता भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘जनतेचा पाठिंबा आणि विश्वास नसेल तर पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ येते. हे फार काळ चालत नाही, ठाकरे सरकार…’ असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
जनतेचा पाठिंबा आणि विश्वास नसेल तर पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ येते…
हे फार काळ चालत नाही, ठाकरे सरकार…— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 24, 2021
प्रमोद जठार यांचा पोलिसांसह सरकारवर गंभीर आरोप –
‘स्थानिक एसपी राणेंना अटक करण्यासाठी आले असता आम्ही त्यांना वॉरंट दाखवण्याची मागणी केली. मात्र त्यांनी ते न दाखवता आमच्यावर दबाव आहे असं सांगितलं. राणे हे केंद्रीय मंत्री असल्याने प्रोटोकॉल नुसार न्यायालयाची परवानगी असणे गरजेची आहे. मात्र वॉरंट न दाखवताच आमच्यावर दबाव असून कारवाई करण्याचे आदेश असल्याचं म्हटलं,’ असा दावा प्रमोद जठार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोलीस खात्यातील काही लोक सरकारने बस म्हटलं की लोटांगण घालतायत’
- पोलिसांवर दबाव, ते राणेंना अटक करायला वॉरंट विनाच पोहोचले; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
- ‘नारायण राणे म्हणजे भाजपने शिवसेनेवर भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा’; शिवसेना नेत्याची विखारी टीका
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘…अन्यथा पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करायला बसू’ ; फडणवीसांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

