Share

शिवसेनेची विचारधाराच चंचल झालीये; दरेकरांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा येणार नाहीत असं कुठं म्हणतोय, असं विधान राऊत यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

‘आम्ही कुठं म्हणतोय नाही येणार म्हणून. भाजप पक्षाचे ते नेते आहेत. आजही ते एक मोठे नेते आहेत. त्यांचा चेहरा मोठा आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काही ताकद निर्माण केली तरच बरोबरीची लढत होऊ शकते.’ यासोबतच, ‘ तमिळनाडू, केरळमध्ये त्यांची जादू चालली नाही. त्यामुळे पुढे काय होईल हे सांगता येत नाही. राजकारण चंचल असतं. इंदिरा गांधींना, जवाहरलाल नेहरुंना , अटल बिहारी वाजपेयींना राजकारण हातात ठेवता आलं नाही,’ असं देखील संजय राऊत यांनी नमूद केलं.

आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘संजय राऊत बोलतात त्याप्रमाणे राजकारणात घडत नाही. राजकारण कधीच चंचल नसते. राजकीय नेते हे चंचल असतात. पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा ही चंचल नसावी. शिवसेनेच्याबाबतीत हिच गोष्ट घडत आहे. संजय राऊत यांनी याचा विचार करावा,’ असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!