औरंगाबाद : गत वर्षी शेती तयार करण्यासाठी जो खर्च लागत होता, त्या खर्चात मात्र दुपटीने वाढ झाली आहे. एक एकर शेती तयार करण्यासाठी नांगरणी, वखरणी अल्प प्रमाणात होती. यावर्षी मत सर्व शेतीची मशागत यंत्राच्या साह्याने करावी लागत असल्याने ट्रॅक्टरचे दर वाढले आहे. डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ट्रॅक्टरचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेती पेरणीसाठी तयार करणे ही तारेवरची कसरत झाली आहे.
चारा टंचाईमुळे शेतक-यांना बैलजोडी ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे, शेती मशागतीसाठी आधुनिक यंत्राचा वापर वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात शेतक-यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. नांगरणी, वखरणी, आदी कामे सुरू केली आहेत. कोरोना संकटाशी सामना करीत असतानाच शेतकरी कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी राजा यंदा नव्या जोमाने पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला दिसत आहे.
मागील पाच-सात वर्षांपासून शेतक-यांवर नैसर्गिक दुष्काळी संकटे येत आहेत. परंतु शेतकरी राजा अजूनही निसर्गाशी सामना करतो आहे. जमिनीचा पोत, जडणघडण सुधारण्यासाठी पूर्वमशागतीची कामे करताना दिसत आहे. कोरोना पाश्र्वभूमीवर शेतकरी दोन महिन्यापासुन आपापल्या घरामध्येच होता. मात्र, शेतकरी वर्गाने घरीच राहून चालणार नाही. शासनानेही याकरिता कृषी क्षेत्राला काही नियम, अटी लागू करून शेतीची कामे व शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याला मान्यता दिल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागत कामात व्यस्त आहे. शेतकरी शेतातील काडी कचरा, शेणखत, नांगरणी असली कामे करीत आहे. खरीप हंगाम लवकरच सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवशी तेजस्विनीनं केली नव्या वाटचालीची सुरुवात ; केली मोठी घोषणा
- ‘आज बाळासाहेब असते, तर कोकणची दुर्दशा पाहून…’; भाजपचं पुन्हा एकदा टीकास्त्र
- वरुडी येथे भरधाव जीप घुसली थेट पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये; ३ पोलीस जखमी
- मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…
- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्र्यांनी दिला डॉक्टरांना ‘हा’ खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

