Share

मराठा आरक्षणाचा मशाल मोर्चा म्हणजे कायद्याचा भंग; गुणरत्न सदावर्ते यांची टीका!

Published On: 

मुंबई : नऊ सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली; त्यामुळे ज्यांची नोकरी व शैक्षणिक प्रवेश अडचणीत सापडले, त्या युवकांमध्ये प्रचंड नैराश्य आले. तसेच हजारो मराठा विद्यार्थी-उमेदवार जीवन संपवण्याच्या काठावर उभे आहेत. म्हणूनच या स्थगितीचा अन्वयार्थ लावणे आणि विविध पर्याय देणे क्रमप्राप्त आहे. यासाठी आता मराठा समाज कमालीचा आक्रमक झाला आहे.

मुंबईत मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च काढण्यात आला आहे. काही वेळेपूर्वीच या मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मशाल मोर्चा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीवर धडकणार आहे. मुंबईमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून हा मोर्चा अडवल्यास त्याचठिकाणी ठिय्या मांडण्याचा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ते असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आजच्या या मोर्चावर सडकून टीका केली आहे. हा अशाप्रकाश मोर्चा काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दबाव आणला जात असून ते चुकीचं आहे. सद्याच्या परिस्थितीमध्ये असा मोर्चा काढणे म्हणजे कायद्याचा भंग असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस महासंचालकांनी अशा मोर्चांना बंदी घालावी, अशी म्हणी सदावर्ते यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!