अलिबाग : अन्वय नाईक प्रकरणी बुधवारी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली. रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तिघांना नगरपालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे.
अर्णब गोस्वामींचा अलिबाग शाळेतील मुक्काम वाढला आहे. अर्नबच्या जामीनावर आज मुंबई उच्च नायालयात सुनावणी झाली. मात्र, कोणताही निकाल समोर आला नसून याबाबत पुढील सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळेच अर्णबला आजची रात्र देखील नगरपालिकेच्या शाळेतच घालवावी लागणार आहे.
अर्णबला एक धक्का, तर एक दिलासा!
अर्णबच्या जामीनावर आजही शिक्कामोर्तब झाला नसला तरी त्याला एक दिलासा देखील मिळाला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. ही मागणी मान्य करून अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, या सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायलयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असता, अर्णवच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी घेतली जाईल असे सत्र न्यायालयामार्फत सांगण्यात आल्याने अर्णबला तूर्तास तरी पोलीस कोठडीपासून दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पाणीपुरी खात असाल तर सावधान! तुमच्या जीवाशी होतोय खेळ
- अर्णबच्या पोलीस कोठडीवरील सुनावणी पुन्हा ढकलली पुढे!
- ‘तुरूंगातून जामिनावर बाहेर आलेले छगन भुजबळ अलीकडे खूपच विनोदी बोलतात’
- ‘फक्त भाषणातून सांगायचं शिवसैनिक माझा श्वास आहे आणि नंतर…’
- मंत्रालयातील अधिकारी वर्गाची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्या – नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

