🕒 1 min read
मुंबई: आज (२५ फेब्रुवारी)मुंबईत भाजपची कोअर कमिटी बैठक (BJP core committee meeting) सुरु असून या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित आहेत. यावेळी भाजप नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
“सज्जन का जीवन निर्भय हो, व्यक्ती व्यक्ती ये कहे गर्व से मुझमे मेरा धर्म बचा हे”, असे म्हणत भाजपची लढाईची सुरुवात झाली असून या लढाईत जनता, गरीब माणूस जिंकेल. भ्रष्ट व्यवस्था पराभूत होईल, आतंकवाद पराभूत होईल. सामान्य महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील रामराज्य येण्याची मुहूर्तमेढ सुरु झाली आहे. असे उद्गार आशिष शेलार यांनी काढले आहे.
दरम्यान आजच्या कोअर कमिटी बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर होत असलेल्या कारवाईवर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
कर्माची परतफेड करावीच लागते; उदयनराजेंचा नवाब मलिकांना अप्रत्यक्ष टोला
Russia-Ukraine War : “प्रिय पुतिन, मी तुझी आई असती तर…”; अभिनेत्रीची अजब इच्छा
Russia-Ukraine war : “आम्हाला युद्धात एकटं पाडण्यात आलं”, युक्रेनच्या राष्ट्रध्यक्षांची खंत
‘युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार’ – उदयनराजे भोसले
- IND vs SL : भारतीय संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत रचले अनेक विक्रम


