Share

मलिकांनी दाखवलेलं ‘ते’ पत्र मुंबईतून आलंच नाही बिहारमधून आलंय; कम्बोज यांचा दावा

Published On: 

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी ड्रग्ज पार्टीवर छापा टाकला आणि या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर कारावाई केली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. यासंदर्भात नवाब मलिकांनी NCB च्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र आल्याचं म्हंटल आहे. याबाबतीत मी लवकरच खुलासा करणार असल्याचेही त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

 

नवाब मलिक यांनी केलेल्या या दाव्याची फेटाळणी करत भाजपच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी मलिकांवर आरोप केले आहेत. मलिकांनी दाखवलं ते पत्र एनसीबी अधिकाऱ्याकडून किंवा मुंबई कडून आलेलं नसून  ते पत्र बिहारमधून असल्याची शंका व्यक्त केली आहे. कम्बोज यांनी त्या पत्रावर असलेल्या स्टॅम्पचा फोटो पोस्ट करत ते बिहारमधील स्टॅम्प असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, मलिक यांनी स्वत:च ते पत्र लिहलं आणि स्वत:लाच पाठवलं आणि एनसीबीकडून आलं असल्याचं भासवलं आहे. हे सगळं त्यांनी स्वत:ला आणि आपल्या जावयाला वाचवण्यासाठी केलं आहे, असा आरोपही यावेळी मोहित कम्बोज यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!