Share

राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर नव्हते – आमदार लोणीकर

Published On: 

🕒 1 min read

जालना : मराठा समाजाची बाजू न्यायालयात नीट मांडली गेली नाही, तसेच त्या संदर्भातले भक्कम पुरावे सादर करता आले नसल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. राज्य सरकारने बाजू नीट मांडली असती तर आरक्षण टिकले असते, असा आरोप माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या निकालावर प्रतिक्रीया देताना ते बोलत होते.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी प्रामणिक प्रयत्न केले होते. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम झाले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात वारंवार वकील अनुपस्थित राहणे, कारण नसताना तारखा वाढवून मागणे अशा अनेक चूका झाल्या. त्याचा परिणाम झाल्यानेच आरक्षण टीकले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष दिल्याने मराठा समाजाचे आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकार आधीपासूनच या विषयात गंभीर नव्हते. त्यामुळे मराठा आरक्षणाला ठाकरे सरकार जबाबदार असून हे सरकारचे अपयश असल्याचा आरोपही लोणीकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!