वर्धा : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. राज्य सरकराने पॉझिटिव्हची माहिती द्यावी, रुग्णसंख्या कमी झाली तर आम्हाला आनंदच होईल, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना आजाराच्या संदर्भात वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात आढावा बैठकीत व्यक्त केले.
राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. त्याचबरोबर मृत्यूची संख्या वाढत आहे. कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन लावला असूनही रुग्णसंख्या वाढत आहे. आजारावर मात करण्यासाठी लसीकरण केले जात असून वर्धा जिल्ह्यातील तीन रुग्णालयांवर अधिक भार आहे.
आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असून ती वाढवण्याची गरज आहे. त्वरित प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी. रुग्णांची वाढती संख्या बघता अतिदक्षता विभागातील खाटा व साधारण खाटा वाढवण्याची गरज आहे. राज्य शासनाने आकडेवारीची लपवाछपवी करू नये, पॉझिटिव्ह माहिती द्यावी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे, रुग्णसंख्या कमी झाली तर आम्हाला आनंदच होईल, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘युपी, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात परिस्थिती चांगली’, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया
- ‘सभा, कमी लसीकरणामुळे भारतात परिस्थिती बिघडली’, डब्ल्यूएचओने सुनावले
- पोलिसांच्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा
- ‘मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे विदेशातून मदतीचा ओघ’, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
- मोठी बातमी : देशातील दीडशे जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

