🕒 1 min read
मुंबई : काल ८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी १५ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, तसेच ज्यांनी लस घेवून १५ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना हा प्रवास करता येणार आहे. यासाठी एक ऍप देखील असणार आहे त्यावर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. तसेच महापालिकेच्या विभागीय कार्यालयात देखील हा पास मिळणार आहे.
दरम्यान, यावरूनच लोकलचा निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती, असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले होते. प्रवाशांसाठी स्मार्टफोन, क्यूआर कोड या अटींसंबंधी बोलताना त्यांनी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती तसेच जनतेची सुविधा लक्षात घेतली पाहिजे. दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करु द्यायचा होता तर मग हा निर्णय फार आधी घ्यायला हवा होता असंही दानवे यांनी म्हटलं होतं.
आता राज्य सरकारने लोकल सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवला असल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे रेल्वे बोर्ड आता काय निर्णय घेणार हे मुंबईकरांसाठी महत्वाचं आहे. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारने लोकल सुरु करण्याबाबत रेल्वेला प्रस्ताव पाठवल्यास तो मान्य करून आम्ही त्वरित जनतेच्या सेवेत लोकल आणू असं म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र पेटवायला मला केवळ दोन मिनिटे लागतील…’- खासदार संभाजीराजे
- ‘खायचं कोणाचं आणि गायचं कोणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…’; चित्रा वाघ यांचा खोचक टोला
- ‘ओ सरकार आता बास झालं…’; पुरबाधित शिये गावच्या गावकऱ्यांची पंचगंगेत उडी
- ‘2047 सालच्या भारताची परिस्थिती ठरवण्यात आपले कृषिक्षेत्रासह शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची’
- पंतप्रधानांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा नववा हप्ता जाहीर; 9.75 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
