मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून राज्यातील वातावरण तापलेलेच आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा सामना दिवसेंदिवस जास्तच रंगात येत आहे. त्यातच आजपासून राज्यात अधिवेशन सुरु झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमने सामने आले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी सरकारवर टीका केली.
“आमची न्यायिक बाजू आणखी भक्कम आहे आणि शिवसेना कोणी बळकावण्याचा प्रयत्न करत असेल, प्रसारमाध्यमातून ज्या बातम्या सोडल्या जातात त्यात काही तथ्य नाहीये. त्यांनी कितीही काहीही मनोरे रचले तरी मी एका वाक्यात सांगते हे सर्व ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असं होणार आहे. सध्या केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून लोकांना घाबरवणारे, आपल्या बाजूने करून घेणे हे सर्व चालू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना, भगिनींना आणि पूर्ण महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून हे सरकार केवळ दिल्लीश्वर म्हणजेच दिल्लीचे वारकरी झाले आहे.”, अशी झणझणीत टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Pratap Sarnaik | यावर्षी सरकारकडून गोविंदांना १० लाखाचं सुरक्षा कवच जाहीर – प्रताप सरनाईक
- Sanjay gaikwad | “लफडी करणाऱ्यांना आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही”; संजय गायकवाडांचा मुंडेंवर हल्लाबोल
- Eknath Khadse | ‘खोके’ आणि ‘ओक्के’चा माझा काय संबंध नाही – एकनाथ खडसे
- TV actress | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले स्वतःशीच लग्न; ‘सोलोगॅमी’ची वाढती क्रेझ
- Sanjay Gaikwad | अजित पवारांनी गद्दारी करून सकाळीच शपथ घेतली होती – संजय गायकवाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

