🕒 1 min read
लखनऊ : एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिमांचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी झाली असल्याचे वक्तव्य ओवैसी यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना ओवैसी यांनी खंत व्यक्त करताना प्रत्येक जातीकडे त्यांचा नेता आहे. मात्र मुस्लिमांकडे नाही असंही म्हटलं आहे.
मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे मुस्लिमांना आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं. आता मुस्लीम वाद्य वाजवणार नाहीत. प्रत्येक जातीकडेही त्यांचा नेता आहे, मात्र मुस्लिमांकडे त्यांचा नेता नाही. उत्तर प्रदेशात १९ टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे, मात्र एकही नेता नाही., असं ओवैसी यांनी यावेळी म्हणाले आहेत.
ज्यांनी त्या लोकांना मारले ते सर्व नष्ट होवोत, असं ओवैसी यांनी यावेळी सीएएविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांचा उल्लेख करताना यावेळी सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन करताना मृत्यू झालेल्यांचा ‘शहीद’ असा उल्लेख केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांशी अभद्र वागणाऱ्याला माफी नाहीचं मग तो कुणीही असो- चित्रा वाघ
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
