Share

वैष्णोदेवी यात्रेत चेंगराचेंगरी कशी झाली? धक्कादायक कारण आले समोर

Published On: 

नवी दिल्ली: जम्मू मधील माता वैष्णोदेवी मंदिर (Mata Vaishno Devi Stampede) परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत १२ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. तर २० भाविक जखमी झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी गोंधळ निर्माण झाला आहे. आता या घटनेचे खरे कारण समोर आले आहे.

कटरा येथील भवन क्षेत्रामध्ये रात्री सुमारे २.४५ च्या सुमारास ही घटना घडली. गेट नंबर ३ जवळ ही दुर्घटना घडली. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोरोनाचे निर्बंध असतानाही मंदिर परिसरात ही चेंगराचेंगरी कशी झाली असा प्रश्न आता यामुळे निर्माण होत आहे. तसेच या भागात सुमारे ५० हजार लोक जमा झाले होते. या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली. आणि त्यात याचे नियोजनही करण्यात आले नव्हते. त्यातच काही भाविकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर धक्काबुक्की झाली. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. याबाबत जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, दर्शनासाठी गेलेल्या गाझियाबादमधील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, माता वैष्णौदेवी मंदिर परिसरात काही भाविक दर्शन घेतल्यानंतर तिथेच थांबले. त्यामुळे गर्दी झाली. तसेच लोकांना बाहेर पडण्यासाठी जागा मिळत नव्हती. थोड्याशा जागेत लोक येत जात होते. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दरम्यान जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, कटरामध्ये माता वैष्णौदेवी भवनातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि जखमींना २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!